Thursday, December 10, 2009

तोडली घरटी कुणी रे....


संमत्ती जेव्हा न होती वादळाची
तोडली घरटी कुणी रे पाखरांची

सांत्वनाला कोणीही येणार नव्हते
काढली समजूत त्यांनी आसवांची

चेहरा माझा मला जर ज्ञात आहे
काळजी घेवू कशाला आरशाची

का स्वतावर कृष्ण आता खुश आहे
ओढ राधेला खरेतर बासरीची

गाव मी माझा जरी सोडून आलो
वेस ना ओलांडली तू उंबऱ्याची

लावण्या छातीस माता खुश नाही
बालकाला ओढ वाटे पाळण्याची

सोसले ना लाड ते कंगाल झाले
एवढी मिजास होती लेखणीची

.....कैलास गांधी

No comments:

Post a Comment