Thursday, November 12, 2009

वादळानंतर दापोली....


वादळानंतर दापोलीची पडझड झाली तरीही पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी प्रत्येक जण कार्यरत झाला. अनेक मदतीचे हात पुढे आले. जनजीवन पूर्णपणे सुरळीत झाले नाही तरी पुन्हा नव्या सुरुवातीला सुरुवात झाली. अशावेळी माझ्या प्रकाश सावंत या कवी मित्राची कविता आठवली
कर तांडव सांडव महापूर अश्रूंचा
उधळून तक जा जीवनपट तू आमचा
वलयांकित होवुनी प्रलय देवूनी जा तू
कर दिशाहीन अन क्षितिजे घेवून जा तू
जमवण्या पुन्हा बघ सहस्र कर हे उठले
नमवण्या तुला बघ अंकुर कितीदा फुटले
आम्ही पुन्हा उभारू दिशा नव्या... क्षितिजे नवी
उदयास यावया वाट पाहतो रवी

No comments:

Post a Comment