Monday, February 8, 2010

जोडे आणि पादुका

रामाच्या पादुका ठेवून
भरताने राज्य केले
बंधुप्रेमापायी त्याने
खुर्चीलाही त्याज्य केले
आता मात्र काँग्रेसमध्ये
'जोडे' उचला स्पर्धा आहे
कधी मुंबई ... कधी लातूर
कधी ठिकाण वर्धा आहे
..............
कधी पूर्ण कॅबिनेट ..
कधी मंत्री अर्धा आहे

...कैलास गांधी

1 comment: