Tuesday, January 5, 2010

धान्यापासून दारू.आणि लंगोटीतला कोंकण!



काजू पासून दारू नको
धान्यापासून काढली पाहिजे
महसूलाची आवक फक्त
. महाराष्ट्रात वाढली पाहिजे.

कोकण विकासाच्या नावाखाली
दुषित प्रकल्पांची भिक आहे
इकडे आंबा करपतोय
तिकडे हिरवे पिक आहे

असच चालू आहे म्हणून
विदर्भाला खंत आहे
लंगोटीतला कोंकण मात्र
अजूनही शांत आहे

विदर्भाप्रमाणे कोंकणचा
अनुशेष जरी भरणार नाही
अंतू बर्वा तरीही म्हणतो
आत्महत्या करणार नाही

....
कैलास गांधी

2 comments:

  1. Ekadam Manatala bollas bagh...

    Apratim aahe... Sagalya kavita vachayala ghetalya aahet...
    Commnets will follow

    ReplyDelete
  2. Waa........
    Shevetchya oleet tumhi jinklat !!

    ReplyDelete