
जाहलेला जो कपाळी वार होता
तोच माझा मानलेला यार होता
घोषणा जुन्या जरी विरून गेल्या
तो नवी आस्वासने देणार होता
तो नवी आस्वासने देणार होता
हार माझी हीच त्याची जीत व्हावी
आज तो माझ्यापुढे जाणार होता
धूळ उडे चेहऱ्याच्या वाळवंटी
अश्रू माझा पापण्यांवर स्वार होता
दूषणांचे श्लोक त्याने वाचले
आजला तो आरत्या गाणार होता
आजला तो आरत्या गाणार होता
आजही तो ना निकाली लागला
कालचा जो फैसला होणार होता
कालचा जो फैसला होणार होता
घेतले चंद्रास मग मी सोबतीला
सूर्य माझ्या मागुनी येणार होता
सोडली तू साथ माझी ठीक झाले
काय हा वेडा कवी देणार होता
सूर्य माझ्या मागुनी येणार होता
सोडली तू साथ माझी ठीक झाले
काय हा वेडा कवी देणार होता
......कैलास गांधी
No comments:
Post a Comment